मानवांचे अहित करून स्वस्वार्थ साधणारे जातीयवादी, धर्मवादी, आतंकवादी, नक्षलवादी असोत किंवा दरोडेखोर, भ्रष्टाचारी, बलत्कारी, खुनी, दंगली घडविणारे, फसवणूक, भेसळ करणारे असोत हे सर्वच कोणत्या ना कोणत्या धर्माला व ईश्वराला मानणारेच असतात. त्यांची देवा -धर्मावर असिम श्रद्धा असते. तेंव्हा धर्मावर प्रेम करणारे धार्मिक आणि देवावर श्रद्धा असणारे श्रद्धाळू चांगले संसंकारित असतात, मानवतावादी असतात असे कोणत्या प्रमाणाच्या आधारावर म्हणावे ?
जे ईश्वरास मानतात. त्यावर अतुट श्रद्धा ठेवतात . त्यास राञंदिवस भजतात -पुजतात. ते सर्व जीवनात सदासर्वकाळ सुखी व आनंदी असतात आणि असे न करणारे दुःखी असतात याचे आधारभूत प्रमाण तरी कोणते ?
अपघाताने, विविध दुर्धर लहान मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे ९९.९९% रोगी हे ईश्वरावर धर्मावर , अध्यात्मावर दृढ श्रद्धा ठेवणारे असूनही दवाखान्यात भरती का असतात ? नैसर्गिक आपत्तीत मरणारे व पंगुत्व आलेले निराळेच.
ज्या व्यक्ती कोणत्याही देव -धर्माला मानीत नाहीत त्यांना नास्तिक व धर्मद्रोही ठरविल्या जाते. परंतु अशी व्यक्तीच निस्वार्थी व ख-या अर्थाने मानवतावादी असतात. जेव्हा -जेव्हा व्यक्ती ही देवाची व धर्माची नाळ तोडत जाते ; तेव्हा - तेव्हा ती अधिकाधिक मानवाच्या जवळ जाते आणि ख-या अर्थाने मानवतादी बनत असते .
भारतात जेवढ्या शाळा नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने गावोगावी मंदिरांची भरमार आहे. भारताची प्रगती खरंच मंदिरं बांदल्याने होणार की शाळा बांधल्याने ? भारताचे भविष्य घडवणा-या शाळा -विद्यार्थ्यांना ऊन - वारा - पाऊस यांची झळ ; आणि देवांसाठी व बुवा, बापू, साध्विंसाठी पंचतारांकित मंदिरं व आश्रम ही या देशाची विसंगती. सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवर शासनाने 80G नुसार कर सवलत न देता त्यावर कर आकारायला हवा.तो पैसा त्या त्या धर्मातील लोकांच्या कल्याणासाठी खर्च करायला हवा.
मानवाच्या सर्वांगीण ऊन्नती साधण्याचा प्रथम मार्ग शिक्षण होय. म्हणून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. निरक्षरता ही राष्ट्र -हासाचे धोतक आहे ना की प्रगतीचे.
निर्जीव दगडांच्या मुर्तीसाठी मंदिरं बांधण्याऐवजी जिवंत ह्रदयाच्या मानवांच्या अपत्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शाळा बांधा ! देवाचे भक्त बनण्यापेक्षा विद्येचे उपासक व्हा !
होमेश भुजाडे
नागपूर
जे ईश्वरास मानतात. त्यावर अतुट श्रद्धा ठेवतात . त्यास राञंदिवस भजतात -पुजतात. ते सर्व जीवनात सदासर्वकाळ सुखी व आनंदी असतात आणि असे न करणारे दुःखी असतात याचे आधारभूत प्रमाण तरी कोणते ?
अपघाताने, विविध दुर्धर लहान मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे ९९.९९% रोगी हे ईश्वरावर धर्मावर , अध्यात्मावर दृढ श्रद्धा ठेवणारे असूनही दवाखान्यात भरती का असतात ? नैसर्गिक आपत्तीत मरणारे व पंगुत्व आलेले निराळेच.
ज्या व्यक्ती कोणत्याही देव -धर्माला मानीत नाहीत त्यांना नास्तिक व धर्मद्रोही ठरविल्या जाते. परंतु अशी व्यक्तीच निस्वार्थी व ख-या अर्थाने मानवतावादी असतात. जेव्हा -जेव्हा व्यक्ती ही देवाची व धर्माची नाळ तोडत जाते ; तेव्हा - तेव्हा ती अधिकाधिक मानवाच्या जवळ जाते आणि ख-या अर्थाने मानवतादी बनत असते .
भारतात जेवढ्या शाळा नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने गावोगावी मंदिरांची भरमार आहे. भारताची प्रगती खरंच मंदिरं बांदल्याने होणार की शाळा बांधल्याने ? भारताचे भविष्य घडवणा-या शाळा -विद्यार्थ्यांना ऊन - वारा - पाऊस यांची झळ ; आणि देवांसाठी व बुवा, बापू, साध्विंसाठी पंचतारांकित मंदिरं व आश्रम ही या देशाची विसंगती. सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवर शासनाने 80G नुसार कर सवलत न देता त्यावर कर आकारायला हवा.तो पैसा त्या त्या धर्मातील लोकांच्या कल्याणासाठी खर्च करायला हवा.
मानवाच्या सर्वांगीण ऊन्नती साधण्याचा प्रथम मार्ग शिक्षण होय. म्हणून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. निरक्षरता ही राष्ट्र -हासाचे धोतक आहे ना की प्रगतीचे.
निर्जीव दगडांच्या मुर्तीसाठी मंदिरं बांधण्याऐवजी जिवंत ह्रदयाच्या मानवांच्या अपत्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शाळा बांधा ! देवाचे भक्त बनण्यापेक्षा विद्येचे उपासक व्हा !
होमेश भुजाडे
नागपूर