Sunday 21 December 2014


भारतातील प्राचिन सिंधू संस्कृतीचे जनक वा निर्माण करते. पशूपालक धनगर आहेत.

उत्खननात सापडलेली भांडी ,नाणी, शिल्प, यांवर चित्र पशूंची आहेत .
आर्यांच्या वारंवार झालेल्या आक्रमणातून सिंधू संस्कृतीचा -हास झाला असे अनेक इतिहासकार मानतात.
पशूपालन, शेती, व्यापार, व्यवसाय, अग्नीचा उपयोग, कुटूंब संस्था यासारख्या अनेक बाबी
वैदिक आर्य हे सिंधूजनांकडून शिकलेत. आर्यांचे प्रमुख्याने दोन कालखंड
पडतात. सुमारे इ.स. पूर्व १५०० ते इ.स.पूर्व १०००
हा वैदिकांचा पहिला कालखंड होय. तर इ.स. पूर्व १००० ते इ.स. पूर्व ६०० हा उत्तर वैदिक काळ
मानला जातो. युजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद (आयुर्वेद) या ग्रंथांची आर्यांनी निर्मिती केली.
वैदिकांच्या वाङमयाचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की सिंधूजनांचे आर्यांनी केलेल्या अनुकरणाची छाप
वैदिकांच्या वाङमयावर पडलेली आहे. अथर्ववेदातील औषधी वनस्पतींचे गुणधर्म हे सिंधू
संस्कृतीतील पशूपालक धनगरांकडून मिळवलेले द्न्यान होय. वैदिकांनी हे द्न्यान ग्रंथ बद्ध केले एवढेच त्यांचे
श्रेय. कालांतराने वैदिक आर्यांनी त्यांच्याच लोकांची ब्राह्मण , क्षञिय , वैश्य असे तीन वर्णात
विभाजन केले.  १) ब्राम्हणांना वेदांचे व इतर द्न्यानाचे अध्ययन व अध्यापन (शिकणे व शिकवणे) तसेच धार्मिक
विधी करण्याचा अधिकार २)क्षञियांना द्न्यार्जन, राज्यकारभार व राज्य
रक्षणाचा अधिकार ३)वैश्यांना शेती, पशूपालन, व्यापार व उद्योग
करण्याचा अधिकार अशापद्धतीने स्वतःत कामाचे वाटप केले. कालांतराने सिंधुसंस्कृतीतील लोकांचा चौथा वर्ण
तयार केला . आणि त्यांना शूद्र (गुलाम) लेखले .या वर्णाला द्न्यानाचा (शिक्षणाचा) अधिकार
नाकारण्यात आला . हलकी सुलकी कामे करणे. वरील तिन्ही वर्णाची मनोभावे सेवा करणे एवढे गुलामीचे
जीवन त्यांच्या वाट्याला आले. वरील वर्णव्यवस्थेवर नजर टाकली असता असे लक्षात
येईल की सर्वोच्च स्थानी ब्राम्हण आहेत. याचाच अर्थ आजचे ब्राम्हण हेच आर्य आहेत. धनगर हे आर्य नव्हे. तर
चातुर्वण्यव्यवस्थेत धनगरांना शूद्र लेखलेले आहे. क्षञिय देखिल नव्हे.
धनगरांना वैदिकांची ही वर्ण व्यवस्था व धर्म अमान्य असल्यामुळेच त्यांनी नेहमीच आपले शूर वीरत्व दाखवून साम्राज्य व राज्य निर्माण केलेले आहे. अनार्य सिंधू जनांच्या दैनदिन जीवन पद्धतीचा बहूतांश
भागाचे अनुकरण वेदांमध्ये आर्यांनी समाविष्ट केलेले दिसते. सिंधू संस्कृतीतील उत्खननात अग्नीकुंड सापडलेले आहे.
सिंधूजन अग्निची पूजा करत. युजूर्वेदातील यद्न्याविषयीची माहिती व उच्चारले जाणारे मंञ हे
सिंधूजनांनचेच अनुकरण आहे. नंतर या यद्न्याचे स्वस्वर्थापाटी वैदिकांनी पशुबळी सारखे प्रकार करून
अतिरेकी स्तोम माजवले. ऋग्वेदात १० मंडले व १०२८ सक्ते आहेत. त्यात निसर्गातील विविध शक्तिंना देव मानून
त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. प्राचीन काळापासून तर आज देखिल पशुपालक धनगरांसह VJ, NT,
ST या समूहात देव -देवतांची स्तूती गाणारी अशी कवने गायली जातात. सिंधूजन हे निसर्ग देवतांचे पुजक होते हे
आपण या आधिच पाहिलेले आहे. सामवेदात गायन कलेविषयी विषयी विवेचन आहे. हे
सुद्धा सिंधूजनांकडून वैदिकांनी प्राप्त केलेले आहे. मूलतः गायन व नृत्य कला ही सिंधूजनांची आहे.
उत्खननात नर्तकीचा ब्रांजचा पुतळा मिळालेला आहे. वैदिकांचे हे वेद बरेच प्राचीन नसून उत्तर वैदिक
काळात वेदांच्या निर्मितीला प्रारंभ झाला व नंतर वारंवार त्यात अनेक वैदिक ऋषिंनी भर घातलेली आहे.
वैदिकांचे वेद, पुराण, रामायण, महाभारत , गीता यांसारखे यासारखे ब-याच मूळच्या वाङ्मयात
वारंवार भर घालून त्यास कसे फुगवण्यात आले हे संशोधकांनी सिद्ध केलेले आहे.
संस्कृत ही वैदिक आर्यांची भाषा आहे. संस्कृत ही भाषा भारतीय मूळनिवासियांच्या अनेक
बोली भाषेच्या संस्कारातून निर्माण झालेली आहे. म्हणून तिला संस्कृत म्हणतात. याच भाषेत
वैदिकांनी आपले वाङ्मय लिहिलेले आहे. वैदिकांच्या वाङ्मयातील फोलपणा शूद्र
लेखलेल्या सिंधूजनांच्या लक्षात येऊ नये या साठी शिक्षणाचा अधिकार नाकारला.
वैदिकांची वर्णव्यवस्था उलथून टाकू नये म्हणून शूद्रांना शस्ञ धारण करण्याचा अधिकार
वैदिकांनी नाकारला. वैदिकांच्या वर्णव्यवस्थेला सुरूंग लावल्या जाऊ नये
म्हणून त्याचा संबंध थेट ब्रम्ह देवाशी नेऊन भिडवला .ब्रह्माच्या तोंडातून ब्राम्हण, बाहूतून क्षञिय,
मांडितून वैश्य आणि पायातून शूद्र जन्मल्याचे वाङ्मयात रूढ करून वैदिकांनी त्यांच्या वाङ्मयाला अषौरुषेय
ठरविले. शास्ञाचा धाक दाखवून शूद्रांना मानसिक पंगू केले.
होमेश भुजाडे नागपू

No comments:

Post a Comment